15 ऑगस्ट ला भाषण कसे (Independence Day Speech In Marathi) सरळ आणि सोपी भाषण कसे करावे जे सर्व लहान मुलांना देखील समजेल अश्या प्रकारचे भाषण आपण देणार आहोत.
भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून 77 वर्षापूर्वी स्वतंत्र झाला होता. आज 15 ऑगस्ट आपण 77 वा स्वतंत्र दिन साजरा करत आहोत. आपल्या भारताला स्वतंत्र देण्यामध्ये अनेक महापुरुषांचा मोलाचा वाटा आहे.
15 ऑगस्ट हा दिवस आपल्या पुरुषांच्या रक्ता थेंबांची यश आहे. आज आपण सोनेरी पहाट हा दिवस शूर वीरांमुळे पाहत आहोत.
ऑगस्ट 1947 ला (happy independence day)आपला भारत स्वतंत्र झाला त्यानिमित्ताने आपण महाविद्यालय शाळा मध्ये भाषण रांगोळ्या काढणे भाषण करणे असे विविध प्रकारच्या स्पर्धा ठेवल्या जातात.
आता आपण 15 ऑगस्ट बद्दल सरळ आणि सोपे भाषण कसे करावे हे पाहणार आहोत.
Independence Day Speech In Marathi/15 August Marathi bhashan
सन्माननीय व्यासपीठ आणि आदरणीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बंधू भगिनींनो मी आज तुम्हाला 15 ऑगस्ट बदल थोडक्यात मोलाची माहिती सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने आयकुन घ्यावे ही नम्र विनंती.
तुम्ही स्वतःला introduce करून देखील भाषण सुरू करू शकता
"शूर वीरांनी दिली आहुती
आपण करूया त्यांच्या विचारांची प्रगती
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा"
!!!Happy independence day!!!
भाषण सुरुवात:
आपणास सर्वांना माहिती आहे की, आपला भारत ब्रिटिशांच्या तावडीत होता.
आपला भारत देश स्वतंत्र करण्यासाठी अनेक महापुरुषांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.
आज आपण हा सुखाचा घास जो खात आहोत ते सर्व श्रेय या बलिदान दिलेल्या महापुरुषांना जाते.
भारताला स्वतंत्र देण्याच्या लढ्यामध्ये स्वतंत्र सैनिक समाजसुधारक आणि देशवासीयांनी भारत भूतालावर रक्त सांडले आहे.
सर्वांना माहितच आहे की, ब्रिटिश सरकार भारतीय लोकांवर किती जुलूम करत होते. ब्रिटिशांनी आपल्या भारतावर १५० वर्ष राज्य केले.
Independance day |
स्वातंत्र्य होण्याची वाटचाल
ब्रिटिश सरकार सक्तीच्या अटी, भेदभाव, तुच्छ वागणूक देत असल्यामुळे भारतीय शूरवीरांच्या मनामधे एकमतची भावना निर्माण झाली आणि तेथूनच खरी स्वातंत्र्यासाठी सर्वात झाली.
भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी मोलाचे कार्य करणारी मंडळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, भगतसिंग सुखदेव राजगुरू चंद्रशेखर आझाद महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य मिळावे यासाठी मोलची कामगिरी केली होती.
लोकमान्य टिळक:
स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही शपथ घेतली.
गांधीजींनी स्वातंत्र्यासाठी असहकार चळवळ, सविनय कायदेभंग अशे अनेक लढे सत्याग्रह केले.
भगतसिंह राजगुरू सुखदेव बुटकेशवर दत्त या युवा क्रांतीकारी वीरांनी सशस्त्र हल्ले केले.
या हल्याच्या प्रकरणात लाठी चार्ज चा आदेश दिलेला ब्रिटिश अधिकारी जेम्स स्कॉट याला जिवे मारण्याचा कट केला होता.
परंतु काही चुकीने तो डाव फसला त्यात दुसरा अधिकारी मारला गेला त्यामुळे भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना लाहोर येथे फाशी देण्यात आली होती.
भारत स्वातंत्र्यासाठी चितगाव कट, काकोरी कट, मेरठ कट, लाहोर कट, नाशिक अलीपुर अशे कट रचन्यात आले होते.
काकोरी कट
पहिला कट ककोरी कट (९ ऑगस्ट १९२५)त्याचे सूत्रधार होते चंद्रशेखर आझाद होते.
काकोरी कट उद्देश हतियार घेण्यासाठी खजिना चोरी करणे हा त्याचा मोटो होता.
काकोरी कटातील सर्व सदस्यांना पकडले आणि त्यामधील
9 डिसेंबर 1927 मध्ये काकोरि कट रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग, अशफाक उल्लाह खॉं आणि राजेंद्र प्रसाद लाहिडी यांना फासी देण्यात आली.
गांधीजींनी आपल्या भारतीय करा किंवा मरा असा संदेश दिला आणि ब्रिटिशांनी भारतातून परत जावे असे ठणकावून सांगितले.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी १९४३ मध्ये हंगामी सरकार स्थापन केले होते. हंगामी सरकारला जर्मनी, जपान इटली अश्या राष्ट्रांनी मान्यता दिली होती.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिन सेना मातेच्या मुक्ती साठी चलो दिल्ली असा नारा दिला.
तुम मुझे खून दो मैं तुम्हे अझादी दुंगा अशे वाक्य ते आपल्या सैन्याला बोलले.
काही काळात नेत्यांना ब्रिटिश सरकारने जेरबंद केले ते पाहून जनतेला देखील समजले की आपण आंदोलन करायला हवे.
जनतेने जेव्हा आंदोलन सुरू केले तेव्हा १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले.
भारतात स्वातंत्र्य तर मिळालेच परंतु महिलांवर अत्याचार, दंगली, भ्रष्टाचार गरीबी अजूनही संपलेली नाही.
जसे आपल्या भारतासाठी सैनिकांनी आपले प्राण दिले तसे तुम्ही आपल्या देशातील होणाऱ्या अत्याचार रोखण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचं झालं आहे नाहीतर त्या शूर सैनिकांच्या आत्म्यास शांती लाभनार नाही.
एवढे बोलून मी माझे बाषण संपवतो.
!!जय हिंद जय भारत!!
Post a Comment