प्रिय शेतकरी बांधवानो तुम्ही जर सोयाबीन हे पीक घेत असाल तर पहिले आपल्या शेतातील मातीचे परीक्षण करून घ्या ( soil test )
टेस्ट रिपोर्ट मधील दिलेल्या प्रमाणे खतांचा हे वापर करा
सुस्पष्ट शेती म्हणजे उत्पादकता वाढविण्यासाठी आणि त्याचे उत्पादन जास्त वाढविण्यासाठी योग्य वेळी अचूक प्रमाणात खत वापर. कीटकनाशक आणि पाण्याचे योग्य वेळी वापर.ई गोष्टी तुम्हला काळजी पूर्वक कराव्या.
१. पेरणी करते वेळी बीज प्रक्रिया करून घ्यावी. बीज प्रक्रिया करण्यासाठी लागणारे आवश्यक घटक १. कार्बनडाजींन २. रायझोबियम ३. थायरम या तिन्हीपैकी कोणत्याही घटकाचा उपयोग करा.
२. घटक त्या बियाण्याला लावल्यावर बियाणे ४० ते ४५ दिवस टिकून राहते.
३. शेतकरी बांधवानो जर तुमच्या घरचे बियाणे असेल तर त्याची उगवण क्षमता पडताळून पाहावी.
४. १ जून पासून १५ जुलै प्रयन्त पेरणी चा कालावधी.
५. दोन सरीतील अंतर हे १.५ फूट ( ४५ सेंटीमीटर ) एवढे ठेवावे.
६. दोन बियांतील झाडातील अंतर ५ सेंटीमीटर.७. बियाण्याची खोली हि ३ ते ५ सेंटीमीटर असावी जर बियाणे हे खोल गेले तर त्याची उगवण्याची क्षमता कमी होते.
सोयाबीन या पिकाची उत्पन्न क्षमता वाढवा
शेतातील सोयाबीन हे पीक चागले येण्यासाठी कारवायांची कामे
एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही नांगरलेल्या शेतीचे रोटर करून घ्यावे. कारण बुरशीचे अवशेष असतात ते रोटर केल्याने पूर्ण पणे नष्ट होतात.
उत्तम प्रकार
बियाण्यामध्ये २५०० व्हरायटी आहेत. त्यामधील या चार
१. JS २०३४ - कालावधी ८० ते ९० दिवसात येते आणि याचे उत्पादन प्रति हेक्टरी २५ ते २६ क्विंटल असे येते. पेरणी जून महिन्यात करावी
प्रति एकरासाठी ३० ते ३५ केजी बियाणे वापरावे.
२. JS २०६९ - या व्हरायटी चे प्रति हेक्टर उत्पादन २२ ते २७ क्विंटल आणि हि व्हरायटी ला पूर्ण पणे काढणीला येणासाठी ८५ दिवस लागतात.
प्रति एकर पेरणीसाठी ४० केजी बियाण्याची आवश्यकता असते.
३. JS ९५६० - हे बियाणे सुद्धा ८० ते ८५ दिवसात पूर्ण येते. आवश्यकता ४० केजी.
प्रति एकर या बियाण्याचे उत्पादन हे २५ ते २८ क्विंटल प्रति हेक्टर होते.
४. JS २०२९ - व्हरायटी पूर्ण पणे येण्यासाठी ९० ते ९५ दिवस लागु शकतात शेतकरी बांधवानो या मध्ये खास गोष्ट म्हणजे पाणी कमी प्रमाणात येते.
बियाण्याचे उत्पादन प्रति हेक्टरला २६ क्विंटल च्या जवळ येते.
बियाणे प्रति एकराला ४० केजी ची आवश्यकता असते.
५. VS ६१२४ -या बियाण्याचे प्रति हेक्टर उत्पादन २० ते २५ क्विंटल .
बियाणे पूर्ण पणे येण्यासाठी ९० ते ९५ दिवस लागतात. बियाणे आवश्यकत ३५ ते ४० केजी एकरासाठी लागते.
शेतकरी बांधवानो तुम्हाला या पाच बियाण्यांपैकी कोणते हि बियाणे निवड करा
शेतकरी बांधवांनो खतामध्ये नत्र, स्फुरद, पालाश हे तीन घटक असतात व खतामध्ये नत्र घटक जरी नसेल तरी चालतो कारण पीक हे नत्र शोषून घेत असते.
सोयाबीन खत
खतामध्ये स्फुरद पालाश आणि गंधक यांची जास्त गरज असते.
शेतकरी बांधवानो १२.३२ .१६ या मध्ये स्फुरद चे ३२% प्रमाण आणि १४.३५.१४ हि दोन खते या पिकासाठी फायदेशीर आहेत व यामध्ये गंधक हे एकराला ७ ते ८ किलो टाकावा.
जर तुम्ही डीएपी खत जर वापरत असाल तर तुम्हला पेरणीसाठी पोटॅश व सल्फर यांची मात्रा द्यावी.
सोयाबीन या पिकाची उत्पन्न क्षमता वाढवा
ताणाचे व्यवस्थापन
शेतकरी बांधवानो वेळच्या वेळी ताणाची खुरपणी करून घ्यावी.
Post a Comment